|
ऍग्रो प्लस
खरीप हंगामात सपाट वाफा पद्धतीने लागवड शक्य असते. लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. माती परीक्षणानुसार खत मात्रा द्यावी. दर्जेदार बियाणे निवडावे. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. डी. एम. काळे खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीसाठी आवश्यक वाफसा अवस्थेमध्ये केव्हाही बदल होतो त्यामुळे शेतकरी असेल त्या स्थितीचा उपयोग करून पारंपरिक पद्धतीने तीन फणी अवजाराने भुईमुगाची पेरणी करतात.
Wednesday, June 19, 2013 AT 04:00 AM (IST)
शेतशिवारात झाडे असण्याचे बरेच फायदे आहेत. बांधावरील झाडांचा शेतात मिसळणारा पालापाचोळा फायदेशीर ठरतो. यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक मिसळण्यासाठी दुरून सेंद्रिय पदार्थ गोळा करून आणण्याचे कष्ट, वेळ आणि वाहतूक खर्च वाचतो तसेच "इन सिटू' कंपोस्ट करण्याचेही फायदे आहेत. कंपोस्ट डेपो लावून त्याची देखभाल करण्यात जाणारा वेळ वाचतो. कंपोस्ट शेतावर पसरण्याचे आणि जमिनीत मिसळण्याचे कष्ट, वेळ वाचतो.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
1) गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर निघणाऱ्या दुधामध्ये (चीक) फॅट, प्रोटिन, लॅक्टोज आणि खनिज क्षार हे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय चिकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे इम्युनोग्लोब्युलीन असतात, ज्यामुळे वासरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या चिकामुळे वासरांचे पोट देखील साफ राहते. चीक हे वासरांसाठी संपूर्ण भोजन आहे, त्यामुळे गाय- म्हैस व्याल्यानंतर अर्ध्या तासात वासरांना चीक पाजावा. 2) ऑक्सिटोसिन हे संप्रेरक पान्हा सोडण्याचे कार्य करते.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
- जनावरांना दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ व ताजे पाणी पाजावे. - जनावरांना दुपारच्या वेळी हवेशीर गोठ्यात अथवा झाडांच्या दाट सावलीखाली बांधावीत. - उघड्यावर बांधलेल्या जनावरांच्या विशेषतः म्हशींच्या पाठीवर ओले गोणपाट/ बारदान टाकावे. - गोठ्याचे पत्रे टीनचे असतील तर त्यावर गवत किंवा उसाचे पाचट टाकावे. - जनावरांच्या आहारात हिरवा चारा द्यावा (लसूण घास, बरसीम, हिरवा मका).
Saturday, June 15, 2013 AT 05:15 AM (IST)
- खरिपातील भाजीपाला लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकाच्या प्रकारानुसार योग्य जैविक खतांची (ऍझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी) तसेच बुरशीनाशकांची (ट्रायकोडर्मा) उपलब्धता करून घ्यावी. * खरीप हंगामात विविध किडींच्या नियंत्रणासाठी स्वतःच तयार केलेला निंबोळी अर्क वापरता येतो, त्यासाठी निंबोळ्या जमा करून योग्यप्रकारे साठवून ठेवाव्यात. * खरीप (पोळ) कांदा लागवड  - या लागवडीसाठी कांद्याचे बी जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर गादी वाफ्यावर टाकावे.
Saturday, June 15, 2013 AT 05:00 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्रावरील उत्तर बाजूस हवेचा दाब 996 हेप्टापास्कल राहणार असून, पश्चिमेस तो 1000 हेप्टापास्कल इतका राहणार आहे. कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू राज्यांवर तुलनेने हवेचा दाब 1002 हेप्टापास्कल इतका अधिक असेल, तर केरळावर हवेचा दाब 1004 हेप्टापास्कल इतका राहील. या सर्व हवेच्या दाबाचे चित्र असे दिसून येते, की मॉन्सूनला हवेचा दाब योग्य असून, मॉन्सूनची प्रगती पुढे कायम सुरू राहील, त्यानुसार पावसाळी हवामान कायम राहील.
Saturday, June 15, 2013 AT 04:00 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचे सर्व धर्मांतील आणि विविध जातींतील लोकांशी मैत्रीचे संबंध होते. शिंदे यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे होते. शिंदे यांना मराठी, कन्नड, संस्कृत, पाली आणि इंग्रजी भाषा येत होत्या.
Thursday, June 13, 2013 AT 05:15 AM (IST)
डॅनिअल रूबेन तळेगाव (दाभाडे) येथे असताना प्रकाश तुळपुळे यांच्याशी चर्चा करण्याची मला संधी मिळाली. नैसर्गिक शेतीबाबत त्यांचा मोठा अनुभव आणि अभ्यास होता. त्यांच्या बोलण्यामध्ये अनुभव, त्यांचे प्रयोग यांचा समावेश असायचा. कच्छ (गुजरात) येथे डॉ. मूलचंद हरिया यांची शेती आहे. या भागात हरणे, काळवीट, नीलगायी, जंगली गाढव मोठ्या प्रमाणात आहेत. एक नीलगाय त्या शेतातच येऊन बाजरीच्या उभ्या पिकात राहिली. कितीही वेळा हाकलली तरी शेत सोडून ती जाईना.
Thursday, June 13, 2013 AT 05:00 AM (IST)
दुभत्या जनावरांसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याचे नियोजन करताना उपलब्ध क्षेत्र, हंगाम, पाण्याची सोय, जनावरांची संख्या, प्रत्येक जनावराची दैनंदिन चाऱ्याची गरज या गोष्टी लक्षात घ्याव्यात. लागवड करताना मका, चवळी, ज्वारी, लसूणघास, यशवंत गवत या चारापिकांची प्रामुख्याने लागवड करावी. सी. व्ही. मेमाणे, डॉ. ए. पी. फर्नांडिस चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई- म्हशींना संतुलन आहार महत्त्वाचा आहे. संतुलित आहारामध्ये चारा आणि खुराक यांचे योग्य प्रमाण असावे.
Wednesday, June 12, 2013 AT 05:00 AM (IST)
जनावरांतील संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे. निरोगी आणि सशक्त जनावरांचेच लसीकरण करावे. लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा थंड वेळेतच करावे. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावे. डॉ. गजानन ढगे - जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. - गोठ्यात हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना करावी. - जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ, ताजे पाणी उपलब्ध करावे.
Wednesday, June 12, 2013 AT 04:45 AM (IST)
सध्या मॉन्सूनसाठी वातावरण अनुकूल असून, येत्या आठ-दहा दिवसांमध्ये पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावयाच्या कामांचे नियोजन करण्याविषयी माहिती घेऊ. डॉ. एस. डी. रामटेके सद्यपरिस्थितीत बागेत कोवळ्या फुटी असण्याची शक्यता आहे. कोवळ्या काडीवर घडनिर्मिती होऊनदेखील काडी पक्वतेस पाऊस आणि ढगाळ वातावरण उशीर होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आतापासून वेलींचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.
Wednesday, June 12, 2013 AT 04:15 AM (IST)
हवामानातील बदलांनुसार जनावरांना विविध आजार होतात. पावसाळ्यात प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, काळपुळी, फुफ्फुसदाह यांसारखे आजार दिसून येतात. या आजारांमुळे जनावरांची उत्पादनशक्ती कमी होते, जनावरे अशक्त होतात. हे लक्षात घेऊन पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांची आरोग्य तपासणी करून वेळेवर उपचार करून घ्यावेत. डॉ. गजानन ढगे 1 ) घटसर्प  - गला घोटू किंवा परपड या नावाने हा आजार ओळखला जातो.
Tuesday, June 11, 2013 AT 04:00 AM (IST)
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि कोकणातील रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये बारमाही तलाव आहेत. बऱ्याच खेड्यांमध्ये गावतळी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी शेततळी खोदली आहेत. या सर्व प्रकारच्या पाण्याच्या साठ्यांमध्ये मत्स्यशेती करता येते. डॉ. विजय जोशी राज्यात मोठे, मध्यम व लहान असे तीन प्रकारचे जलाशय आहेत. हे जलाशय भाड्याने घेऊन त्यात मासे वाढविता येतात. सध्या जलाशयातील माशांचे सरासरी उत्पन्न 11.11 कि.ग्रॅ.
Monday, June 10, 2013 AT 03:45 AM (IST)
वास्तवात ही शेती पद्धत नव्हेच कधीही न संपणारा अभ्यास आहे. "एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या संतवचनास अनुसरून एकमेकांना मदत करीत परिपूर्ण जगणे म्हणजे शेती पद्धती आहे. एका प्रकारचे पीक सगळीकडे सारखे "वागेल' असे नाही. प्रत्येक ठिकाणी त्यात काही ना काही फरक असणे स्वाभाविक आहे. एखाद्या पिकात तुम्हाला काही दिसेल, जाणवेल ते मलाही दिसेलच असे नाही. म्हणून तर "परिवाराची' उभारणी.
Sunday, June 09, 2013 AT 12:00 AM (IST)
महाराष्ट्राच्या उत्तरेला हवेचा दाब 1002 हेप्टापास्कल आहे, तर दक्षिण दिशेला तो 1004 हेप्टापास्कल आहे. केरळ येथे हवेचा दाब 1006 हेप्टापास्कल इतका आहे. विषुववृत्तापासून सात अंशावर हवेचा दाब 1008 हेप्टापास्कल आहे, तर पाच अंशावर तो 1010 हेप्टापास्कल इतका आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेस हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरवात झाली असून, पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 301 अंश केलव्हीन्स इतके वाढले आहे.
Saturday, June 08, 2013 AT 04:45 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला. कोल्हापूर संस्थानाचे ते आदर्श राजे होते. त्यांनी समाज सुधारक म्हणून केलेले कार्य सर्व समाजाला हितकारक ठरले. छत्रपती शाहू महाराज यांनी कारभार पाहण्यास सुरवात केल्यानंतर प्रथम मागासवर्गीय लोकांसाठी कार्य सुरू केले. सर्वांसाठी मोफत शिक्षण, राहण्यासाठी वसतिगृहे आणि सर्व शिक्षितांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्याच्या राज्य कारभाराचे ते सूत्रच बनले.
Thursday, June 06, 2013 AT 05:00 AM (IST)
1) केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामाच्या रचनेनुसार तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन बायोगॅसच्या बांधकामाचे नियोजन करावे. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे अशा ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र बांधावे.
Thursday, June 06, 2013 AT 04:45 AM (IST)
डॅनिअल रूबेन जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढविण्यासाठी कंपोस्ट खताचा वापर फायदेशीर ठरतो. कंपोस्ट खताच्या बरोबरीने बायोगॅस स्लरीचा वापरही तेवढाच फायद्याचा आहे.बायोगॅस संयंत्रातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारी स्लरी किंवा राळ हे सर्वोत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. याबाबत विविध प्रकारचे संशोधन होत आहे. बायोगॅस स्लरीचे वाईट परिणाम होत नाहीत, याला कारण आहे ते म्हणजे त्यातील नत्राचे अल्प प्रमाण.
Thursday, June 06, 2013 AT 04:15 AM (IST)
बीटी कापसासाठी लागवडीपूर्वी मशागत झाल्यानंतर शेताचे सर्वेक्षण करून लागवडीचे अंतर ठरवावे. जमिनीचा प्रकार, कापसाची जात व पाण्याची उपलब्धता या बाबीचा विचार करून अंतराची निवड करावी. शक्यतो जोड ओळीतील लागवडीचे अंतर निवडावे. ठिबक सिंचन पद्धतीने जमिनीत कायम वाफसा स्थिती राहून झाडांच्या मुळांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होतो. सर्व झाडांना पाण्याचे समान वाटप होते. पाण्याद्वारे खतांची मात्रा विभागून देता येते. डॉ.
Thursday, June 06, 2013 AT 03:30 AM (IST)
स्टेनर यांनी 1924 मध्ये मांडलेली बायोडायनॅमिक शेती पद्धती भारतात येऊन फक्त 15 ते 20 वर्षे झालेली आहेत, त्यामध्ये भारतीय स्थानिक वनस्पतींचा वापर करण्याचे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर परदेशांमध्ये गाईंची शिंगे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. भारतात गो-हत्या बंदी व धार्मिक परंपरेमुळे गाईंची शिंगे अधिक प्रमाणात मिळू शकत नाहीत, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे.
Sunday, June 02, 2013 AT 12:00 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे श्रीलंकेजवळ हवेचा दाब 1006 हेप्टापास्कल असून, केरळवर तो 1004 हेप्टापास्कल इतका असेल. तसेच महाराष्ट्रावर हवेचा दाब 1002 हेप्टापास्कल इतका असेल. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे मॉन्सून वारे वाहतात. या नियमानुसार मॉन्सून वारे महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वाहण्यास हवेचा दाब अत्यंत अनुकूल झाला आहे.
Saturday, June 01, 2013 AT 04:30 AM (IST)
आंत्रविषार : प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात. उपाययोजना  - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी.
Wednesday, May 29, 2013 AT 04:45 AM (IST)
जनावरांना घटसर्प, फऱ्या हे रोग प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला आढळतात. या रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जनावरांना वेळीच लसीकरणाची आवश्यकता असते. घटसर्प : पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे, उद्भवतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबविण्यात येते.
Wednesday, May 29, 2013 AT 04:45 AM (IST)
हवामानातील बदलामुळे जनावरांच्या उत्पादन व प्रजोत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. जनावरांच्या खाद्यात बदल झाल्याने पोटाचे विकार होतात. सध्याच्या काळात जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यवस्थापनात बदल करावेत. 1) गोठ्यातील गव्हाणी, मलमूत्राची नाली, बसण्याची जागा नेहमी स्वच्छ असावी. या काळात जिवाणूंचा प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे गोठे अधूनमधून जंतुनाशक द्रावणाने धुऊन घ्यावेत.
Wednesday, May 29, 2013 AT 04:30 AM (IST)
उन्हाळ्यात गाई, म्हशींमध्ये गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. याचे प्रमुख कारण म्हणजे माज व्यवस्थित ओळखू न येणे, तसेच दोन माजांमधील अंतर वाढणे किंवा कमी होणे. काही वेळा म्हशींमध्ये मुका माज असतो. यासाठी गाई, म्हशींचे आरोग्य व्यवस्थापन, संतुलित खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. डॉ. पांडुरंग नेटके, डॉ. राजेश यमपुरे उन्हाळ्यामध्ये गाई, म्हशींना संतुलित आहार न मिळाल्यामुळे तसेच वातावरणाचा ताण वाढल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते.
Tuesday, May 28, 2013 AT 04:45 AM (IST)
अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे परंतु या परिस्थितीत डगमगून न जाता पर्यायी व्यवस्था शोधून, त्याचा उपयोग करून दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करता येणे शक्य आहे. काही उपलब्ध वनस्पतींचा उपयोग वैरण म्हणून करता येतो. प्रा. आर. आर. शेळके, डॉ. एस. डी. चव्हाण महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधात असून, पाऊसमानाप्रमाणे त्यातील वनस्पतींचे खालीलप्रमाणे मुख्य प्रकार आहेत.
Tuesday, May 28, 2013 AT 04:30 AM (IST)
दूध काढणाऱ्यात बदल, दोहनाच्या वेळी गाई भिणे, आजारपण, माज, औषधोपचार या व इतर कारणांमुळे दुधाचे उत्पादन व त्यातील घटकांच्या प्रमाणावर फरक होतो. अशावेळी बाह्य घातक रसायने न देता आवश्यक समतोल आहार, पालनपोषण, काळजी, निगा व योग्य व्यवस्थापन इत्यादींद्वारे दूध उत्पादनामध्ये भरीव प्रगतीसह थोड्याफार प्रमाणात फॅटही वाढविता येऊ शकते. प्रा. आर. आर. शेळके, डॉ. एस. डी.
Monday, May 27, 2013 AT 05:00 AM (IST)
ज्वारीपासून रवा, पोहे आणि लाह्या तयार करता येतात. या पदार्थांचे पौष्टिक मूल्यही चांगले असते. हे पदार्थ तयार करण्याची पद्धत सोपी आहे. शहरी भागात या पदार्थांच्या मागणीत वाढ होत आहे. दिनेश क्षीरसागर ज्वारीचा रवा (सोजी)  - चांगल्या प्रकारची ज्वारी निवडून, स्वच्छ करून त्यामधील काडीकचरा बाजूला करावा. चाळणी करून प्रतवारी करावी. त्यानंतर गिरणीतून ज्वारीचा रवा (सोजी) दोन पद्धतीने तयार केला जातो. 1) 1.8 मि.मी.
Monday, May 27, 2013 AT 04:30 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्रावर हवेचा दाब 1006 हेप्टापास्कल इतका असून, पूर्व आणि उत्तर दिशेस तो 1004 हेप्टापास्कल आहे. हिंदी महासागरावर हवेचा दाब 1008 हेप्टापास्कल इतका असल्याने समुद्रावरून मॉन्सून वारे भारतीय आणि महाराष्ट्राच्या भूपृष्ठाकडे झेपावण्यास हवामान आणि हवेचा दाब अनुकूल आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस हवेचा दाब आणि दिशा अनुकूल आहे. बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान वाढत असून, ओरिसा व श्रीलंकेजवळ ते 303 केलव्हीन्स इतके वाढेल.
Saturday, May 25, 2013 AT 05:00 AM (IST)
अंदमानमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे. या वर्षी तो इतरत्र वेळेवर येऊन सरासरी गाठेल असा अंदाज आहे. पावसाच्या प्रगतीवर व पुढील वर्षातील शेतीमालाच्या अपेक्षित उत्पादनावर यापुढील किमती अवलंबून असतील. खरीप पिकांच्या ऑक्टोबरनंतरच्या फ्युचर्स किमती त्या वेळचा कल दाखवतील व त्याचा उपयोग शेतकरी अशी पिके किती प्रमाणात घ्यावीत हे ठरवण्यासाठी करून घेऊ शकतील. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी आतापर्यंत गवार बी व गवार गम यांचे फ्युचर्स व्यवहार बंद होते.
Friday, May 24, 2013 AT 05:15 AM (IST)
जांभळाच्या पिकलेल्या फळांमध्ये आहारमूल्ये व औषधी गुणधर्म असल्याने त्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर मागणी असते. जांभूळ फळांपासून जॅम, जेली, बर्फी, टॉफी, जांभूळ पोळी, गराची पावडर, बियांची पावडर, कच्च्या फळांपासून व्हिनेगार इत्यादी पदार्थ तयार करता येतात. प्रक्रियायुक्त पदार्थांमुळे हंगाम नसतानाही फळांचा आस्वाद घेता येईल. डॉ.
Friday, May 24, 2013 AT 04:15 AM (IST)
|