Last Update:
 
ऍग्रो स्पेशल
सातारा जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग सातारा जिल्ह्यातील गोखळी (ता. फलटण) गावचे तरुण पदव्युत्तर प्रयोगशील शेतकरी नितीन गावडे गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोपण जमिनीत सूर्यफुलाची शेती करतात. कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या या पीकाविषयीचा त्यांचा अनुभव चांगला आहे. या वेळी त्यांनी सूर्यफुलात परागीभवनासाठी मधमाशी वापराचा प्रयोग करून एकरी अकरा क्विंटल यशस्वी उत्पादन मिळविले आहे.

Wednesday, May 22, 2013 AT 04:30 AM (IST)

कळंब, जि. उस्मानाबाद : पाणी व्हतं तवा मोठ्या आशेनं ऊस केला. दिस-रात शेतात राबून पिकवलाही. उसाची तोडणीही झाली अन ऊस कारखान्यालाही गेला. पण उसाचं पेमेंट अजून मिळालंच न्हाई. साखर कारखान्याला ऊस घालून दोन वर्षे झाली. कुणाला वर्ष, तर कुणाला सहा महिने झाली तरी पेमेंट मिळालं न्हाई...ही व्यथा आहे मोहा (ता. कळंब) येथील शेतकऱ्यांची. शेतकऱ्याला भाव तर सोडाच, पण दिवस-रात्र जागून पिकविलेल्या उसाचे पेमेंटही साखर कारखान्यांकडून वर्षानुवर्षे दिलं जात नाही.

Wednesday, May 22, 2013 AT 04:15 AM (IST)

- उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी चिंतेत - शेतीतील नापिकीने आर्थिक संकट उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या वीस कि.मी. अंतरावर तेर नावाचं गाव. शेतीवरच गावची अर्थव्यवस्था आधारलेली. गावचं अर्थकारण तसं चांगलं, पण यंदाच्या दुष्काळानं सारी घडी विसकटली. गणेश फुंदे तब्बल वीस हजार लोकसंख्येचं तेर गाव दुष्काळाशी लढतंय. एकरपासून ते थेट चाळीस एकरापर्यंतचे शेतकरी गावात आहेत. यंदा ते सर्वच चिंतेत आहेत.

Tuesday, May 21, 2013 AT 04:30 AM (IST)

- गेल्या वीस वर्षांपासून भाडेपट्ट्याने दरवर्षी करतात कलिंगडाची शेती - घाऊक बाजार आणि स्थानिक बाजारातील विक्री यांचा घातला मेळ कोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत. फळांची प्रतवारी करून बाजारपेठेचे योग्य नियोजन त्यांनी केले आहे.

Tuesday, May 21, 2013 AT 03:45 AM (IST)

लातूर जिल्ह्यातील सूरज देशमुख यांची प्रेरणादायी शेती लातूर जिल्ह्यातील सूरज देशमुख यांनी शेतीत काहीही अनुभव नसतानाही आपली वडिलोपार्जित शेती मोठ्या जिद्दीने विकसित केली आहे. त्यात नगदी पिकांचे काटेकोर नियोजन करीत, नव्या गोष्टी शिकत व आर्थिक घडी सुयोग्यपणे बसवत आत्मविश्‍वासाने विकासाची दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. रमेश चिल्ले शेतीत समस्या प्रचंड असतात.

Monday, May 20, 2013 AT 04:45 AM (IST)

* बागा जळालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही * खरीप, रब्बी गेला, पेरणीची सोय नाही * कर्ज देणार का नाही, कुणालाच माहिती नाही औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेत प्रशासनाकडून आणि मुंबईतील बैठकीतून शासकीय पातळीवरून दुष्काळग्रस्तांसाठी मदत सुरू असल्याचं कायम सांगण्यात येत असलं तरी बागांचं सरपण झालं, अद्याप अनुदान नाही, गावं तहानलेलं, टॅंकर येत नाही. टॅंकर आला की गावात जीवघेणा प्रवास सुरू होतो.

Monday, May 20, 2013 AT 04:30 AM (IST)

उसाचं ऐश्‍वर्यसंपन्न आगार अशी ओळख असलेल्या पैठण तालुक्‍यातील गावं कधी नव्हे एवढी दुष्काळानं होरपळून निघाली आहेत. गावशिवारात तासन्‌ तास चालणारा मोटारपंप आता पूर्णपणे बंद पडला आहे. गोदाकाठचं हिरवेगार शिवार वाळून गेलं असून, गावागावांत पाण्याच्या शोधात फक्‍त कूपनलिका खोदाईचे काम सुरू आहे. गावात घरागणिक कूपनलिका खोदून पाण्याचा शोध घेतला जात असला तरी खोलवर घेतलेल्या कूपनलिका फक्‍त धुराडाच टाकत असल्याने पाणी गेलं तरी कुठं असा प्रश्‍न गावांना पडला आहे.

Sunday, May 19, 2013 AT 12:30 AM (IST)

नेदरलॅंडमधील शेतकरी दुग्धोत्पादनासाठी सानेन, अँग्लोन्युबियन आणि टोगनबर्ग या जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांचे संगोपन करतात. शेळ्यांमधील आनुवंशिक सुधारणा करण्याकरिता "डच गोट मिल्क प्रोड्युसर' या नावाची शेतकरी संघटना तेथे काम करते. येथील सानेन शेळी दर दिवसाला सरासरी पाच लिटरपर्यंत दूध देते. शेळीच्या दुधाच्या बरोबरीने चीज, पावडरलाही चांगली मागणी आहे. जगामधील काही देशांत शेळीपालन हे मुख्यतः दूध व मांस उत्पादनासाठी केले जाते.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

कॅटरिन व्हॅन्ट हुप्ट या नेदरलॅंडमधील पशुवैद्यक आणि पशू व्यवस्थापन सल्लागार आहेत. नेदरलॅंड तसेच लॅटिन अमेरिकी देशात त्यांनी काम केले आहे. त्या देशी जनावरे विकास कार्यगटाच्या समन्वयक आहेत. नुकत्याच त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या अभ्यास दौऱ्यावर होत्या, त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद... 1) सध्याच्या काळात नेदरलॅंडमधील दुग्ध व्यवसायाचे चित्र काय आहे? नेदरलॅंड हा पशुपालन आणि दूध प्रक्रिया उद्योगात आघाडीचा देश आहे.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

डेऱ्यात उंट फसल्याने अगोदर उदेभानच्या घरावर मोर्चा काढणारे लोक आता नाही त्या शिव्या उदेभानला देत होते. उंट जिवंत आहे तोपर्यंत बाहेर काढा, मेल्यावर धम्मक मारायला लागल्यावर आम्ही आदी तुमचे नाक दाबून मारू, अशा धमक्‍या उदेभानला देत होते. रोशनबायला उंटाचा लई पुळका येत होता, त्यामुळेच उदेभान या झोलांडात अडकला होता. एवढे सारे घडूनही रोशनबायची उंटावरची माया काही पतली होत नव्हती.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

दुष्काळानं सारं गावशिवार होरपळून निघालंय. दरवर्षी या टायमाला खरिपाची मशागत सुरू असती. पण बैल छावणीत आहेत. सरकार म्हणतंय, दहा दिवस मशागतीसाठी न्या, पण चारा, पाणी तुमचा तुम्ही करा. इथं प्यायलाच पाणी न्हाई तर ही सोय कशी करायची अन्‌ मशागत कधी करायची असा प्रश्‍न बीड जिल्ह्यातील पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे.

Saturday, May 18, 2013 AT 04:45 AM (IST)

विदर्भातील शेतशिवारातही नजीकच्या काळात प्रयोगशीलतेच्या बळावर आर्थिक प्रगतीचे वारे वाहू लागले आहेत. प्रयोगशीलतेचा वारसा जपणाऱ्या या शेतकऱ्यांमध्ये बोरगावमंजू (जि. अकोला) येथील अशोक गवई यांचा समावेश होतो. देशी, सुगंधी धने अर्थात कोथिंबिरीच्या बीजोत्पादनातून त्यांनी सुधारित शेतीकडे वाटचाल केली आहे. अकोला या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावरील बोरगावमंजू हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वसलेले आहे.

Saturday, May 18, 2013 AT 04:15 AM (IST)

बिटरगाव खु. (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रमेश बोरगडे यांनी कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्यासाठी रोपवाटिका, फुलशेती, भाजीपाला व नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. विविधांगी शेती व त्याला दुग्ध व्यवसायाची जोड देत एकाच प्रकारच्या शेतीतील जोखीम कमी करून शेती अधिकाधिक फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आमीन चौहान रमेश बोरगडे यांनी उद्यानविद्या शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले.

Friday, May 17, 2013 AT 04:45 AM (IST)

- शेतकऱ्यांच्या व्यथांनी ओलांडली सीमा - रोजगारासाठी थेट मध्यप्रदेशात स्थलांतर - मनरेगाचा फक्‍त गाजावाजाच - दिवसा काम केलं तरच राती पेटतात चुली साह्येब, कामाला गेलं तव्हा कुठं गावात चुली पेटत्याती, सारं गाव बारमाही मजुरीवरच पोट भरतंय. आवंदाच्या दुष्काळानं हाताला काम न्हाई, गावातली काही पोरं कामासाठी मध्यप्रदेशात गेलीत. कुटुंब जगवावं कसं? अशा व्यथा जालना जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांनी मांडल्या. शिराढोण (ता.

Thursday, May 16, 2013 AT 04:15 AM (IST)

कोल्हापूर जिल्ह्यात गटशेतीतून धाडसी प्रयोग जिल्ह्यातच शोधली बाजारपेठ ऊस, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीद्वारे चक्क "स्ट्रॉबेरी"चे नगदी पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी केला आहे. बच्चे सावर्डे येथील बळिराजा कृषी विज्ञान मंडळाच्या दहा शेतकऱ्यांनी अडीच हेक्‍टरवर स्ट्रॉबेरी पिकवताना त्याचे मार्केटिंगही जिल्ह्यातच केले. अशा प्रयोगांतून राज्यातील शेतकऱ्यांना सुधारित शेती व पीकबदलाची एकच दिशाच मिळाली आहे.

Thursday, May 16, 2013 AT 04:00 AM (IST)

जालना जिल्ह्यातील शेतकरी यंदाच्या दुष्काळाने आणि बागा वाचविण्याच्या लढाईत पुरता कर्जबाजारी झाला आहे. वाळलेल्या मोसंबीचा चुरा देऊन जनावरांची भूक भागविली जात आहे. सारी गावं दिवसरात्र फक्‍त पाण्याचाच शोध घेत आहेत. दुष्काळाने इथल्या लोकांचं जीवन हिरावून घेतलंय आणि तिकडं शासनदरबारी आहे त्याबाबत केवळ आणि केवळ उदासीनता. गणेश फुंदे अंबड, जि. जालना : दुपारी बाराची वेळ.... उन्हाचा वाढत जाणारा पारा....

Wednesday, May 15, 2013 AT 04:30 AM (IST)

उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पाचे यश फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साकत (ता. जामखेड, जि. नगर) गावातील अशोक मुरूमकर यांच्याकडे आता जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचा कळप तयार झाला आहे. करडांच्या विक्रीतून त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ लागली आहे.

Wednesday, May 15, 2013 AT 04:00 AM (IST)

पपई प्रक्रियेतून राशिवडेच्या तरुणाने शोधला उत्पन्नाचा स्रोत धाडसाने उभा केला प्रकल्प समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील विजय तापेकर पपई प्रक्रिया उद्योगाकडे वळले. त्यासाठी प्रशिक्षण घेतले. भांडवल उभे केले. धाडसाने या उद्योगाची उभारणी केली. आज पपईतून टुटी-फ्रुटीची निर्मिती करून या व्यवसायातून त्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. राजेंद्र घोरपडे विजय तापेकर यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे.

Tuesday, May 14, 2013 AT 04:15 AM (IST)

श्रम, वेळ, पैशात बचत होणार विरार परिसरातील एस. के. बाबा यांची प्रयोगशील शेती ठाणे जिल्ह्यातील विरार परिसरातील नंदाखाल येथील कैतन पास्को लोपिस ऊर्फ एस. के. बाबा यांनी भात झोडणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या वापराने श्रम, पैसा, वेळ यांत बचत होऊन भात उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे. भातशेतीला प्रयोगशीलतेची जोड देत बाबांनी आपल्यासह परिसरातील शेतकऱ्यांचीही प्रगती करण्याची वृत्ती कृतीतून जोपासली आहे. प्रा.

Tuesday, May 14, 2013 AT 04:00 AM (IST)

माळशिरस तालुक्‍यातील पांडुरंग म्हसवडे यांचे प्रयोग यंदाच्या वर्षीच्या पाणीटंचाईच्या झळा राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. मात्र प्रतिकूल परिस्थितीवर हिमतीने व जिद्दीने मात करता येते हा आशावाद बोरगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील पांडुरंग म्हसवडे यांनी आपल्या शेतीतील प्रयोगांतून सिद्ध केला आहे. जनावरांना चारा म्हणून आणलेल्या उसाच्या वाड्यापासून लागवडीसाठी त्यांनी बेणे मिळवीत उसाची रोपे तयार केली. त्यापासून लागवड केली.

Monday, May 13, 2013 AT 04:30 AM (IST)

राजगुरुनगर तालुक्‍यात कामधेनू प्रकल्प गोठ्यात एका गाईची संख्या पोचली नऊपर्यंत अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो. रेठवडी आणि गोसासी (जि. पुणे) या गावांत कार्यरत असलेल्या जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. त्यातून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. सतीश कुलकर्णी रेठवडे आणि गोसासी (ता. राजगुरुनगर, जि.

Monday, May 13, 2013 AT 04:15 AM (IST)

नेवासे तालुक्‍यात 340 बंधाऱ्यांची दुरुस्ती लोकसहभागातून झाली जलसंधारणाची विविध कामे साडेतेरा लाख ब्रास गाळाचा वापर सुमारे बाराशे एकर शेती पीक घेण्यासाठी सज्ज दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेवासे तालुक्‍यात (जि. नगर) सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजेच लोकसहभागातून जलसंधारणाचे भरीव काम केले. सुमारे तीन कोटी रुपये खर्चातून 340 पाणी साठवण बंधाऱ्यांची खोली व रुंदी वाढविण्याचे मोठे काम यातून झाले आहे.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

इस्राईलमधील कृषी संशोधन संस्थांमध्ये जगभरातील संशोधक, शेतकरी आणि विद्यार्थांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. कुठल्याही देशाने त्यांना काय गरज आहे, हे सांगितल्यास तसा अभ्यासक्रम या संस्थेतील तज्ज्ञ तयार करतात. या अभ्यासक्रमासाठी फी आहे. विविध पीक पद्धती आणि पाणी व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, फळबाग, फुलशेती, मत्स्यशेती, त्याचबरोबरीने विविध पिकांचे लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत सुधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण या संस्थांमध्ये मिळते.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने दक्षिण आफ्रिकेतील मृदा व खत विषयातील तज्ज्ञ चारूस डी प्लेसीस यांना भारतभेटीवर नुकतेच आमंत्रित केले होते. द्राक्ष पिकामध्ये दक्षिण आफ्रिका हा जागतिक स्तरावर आघाडीचा देश आहे. साहजिकच तेथील तंत्रज्ञानही त्या तोडीचे आहे. महाराष्ट्रातील बागायतदारांना चारूस यांचे ज्ञान व अनुभव यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांची विभागनिहाय व्याख्यानेही आयोजित केली होती.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

भावनाताई धुणं वाळू घालायला गच्चीवर गेली होती. तर कानावर एकदम गलका ऐकायला आला. तिला नवल वाटलं. कशाचा कलमा-हलमा चालू हाये हा... कुठी चाल्ले एवढे लोकं? मनालाच प्रश्‍न विचारून तिने गर्रकन मागे वळून पाहिलं अन्‌ पाहातच राहिली. दहा-बारा माणसं डी.पी.जवळून इकडंच भरीवरच्या घरी येताना दिसत होते. गच्चीचा कठडा धरून ती पाहू लागली अन्‌ लक्षात आलं, हा गलका आपल्याच घराकडे येत आहे. पण कशासाठी? एकाएकी गलक्‍यातले शब्द टाळसर झाले.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

(लेखक औरंगाबाद येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी हे छोटेसे गाव. गावात भाजीपाला व फुलशेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बाजारपेठ औरंगाबादच असल्याने बाजारासाठी फार काही त्रास घेण्याचा प्रश्‍न येत नाही. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत भाजीपाला व फुलशेतीसाठी पुरेसे पाणीच शिल्लक राहिले नाही.

Saturday, May 11, 2013 AT 04:30 AM (IST)

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सानप कुटुंबीयांनी शिक्षण, नोकरीसह शेतीलाही महत्त्व देत त्यातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. रब्बीमध्ये हरभरा हे पीक कायम ठेवत त्याची किफायतशीर शेती केली आहे. विनोद इंगोले मालेगाव तालुक्‍यातील (जि. वाशीम) ब्राह्मणवाडा येथील राजाराम सानप हे सेवानिवृत्त शिक्षक. त्यांची तीनही मुले उच्चशिक्षित. त्यापैकी थोरले सुरेश हे वाणिज्य पदवीधर.

Saturday, May 11, 2013 AT 04:00 AM (IST)

वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव सिरसाठ यांनी सरकारी नोकरीच्या बरोबरीने शेती तसेच शेळीपालनाकडे लक्ष दिले आहे. अर्धबंदिस्त पद्धतीने बोअर शेळीपालन त्यांना फायदेशीर दिसून आले आहे. शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन आणि चाऱ्याचे योग्य नियोजन असेल, तर कमी व्यवस्थापन खर्चात शेळीपालनातून चांगला नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. रमेश चिल्ले वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव ज्ञानोबा सिरसाठ यांची घरची तीन एकर कोरडवाहू शेती.

Friday, May 10, 2013 AT 05:00 AM (IST)

उच्च शिक्षित स्वाती शिंगाडे यांची शेतीत आश्‍वासक वाटचाल जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व शिक्षण या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात यश सहज शक्‍य असते. हे सिद्ध केले आहे बारामती तालुक्‍यातील (जि. पुणे) सोनकसवाडी येथील स्वाती अरविंद शिंगाडे यांनी. माळरान जमिनीवर दोन दशकांपूर्वी जिथे कुसळदेखील उगवत नव्हते तेथे पॉलिहाऊसमध्ये त्यांनी फुलशेती फुलवली आहे.

Friday, May 10, 2013 AT 04:30 AM (IST)

लातूर जिल्ह्यातील ममदापूर येथील ऍड. बाळासाहेब दाताळ यांनी खाण्यासाठीचा (भाजीसाठीचा) म्हणजे व्हेजिटेबल सोयाबीन या प्रकारातील पीकवाणाचा प्रयोग केला आहे. प्रथिनांनी भरपूर टपोऱ्या व मोठ्या दाण्यांचा हा सोयाबीन कुपोषणाला चांगला पर्याय ठरू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. दोन वाणांचा राज्यातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग असावा. आपल्या राज्यासाठी नवीन प्रकारचा हा पीकबदल फायदेशीर ठरू शकतो अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. टी. एस.

Thursday, May 09, 2013 AT 03:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: