Last Update:
 
प्रादेशिक
पालकमंत्री वळवी : जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख 27 हजार हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड होते. त्यापैकी सुमारे 98 हजार हेक्‍टर क्षेत्र कपाशीखाली आणण्याचे नियोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. शनिवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप कृषी आढावा बैठक झाली. यामध्ये ही माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ऍड. पद्‌माकर वळवी होते.

Monday, May 20, 2013 AT 04:15 AM (IST)

खेमनर-पाटील  - पिंप्रद येथे "मार्ट'चा पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात गिरवी, जि. सातारा  - कृषी पर्यटन केंद्रात पर्यटनाच्या आनंदाबरोबरच दुर्मिळ भाज्या उपलब्ध केल्यास अधिक संख्येने पर्यटकांना आकर्षित करता येईल. कृषी पर्यटनसंदर्भात शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी शासन धोरण आखण्याच्या विचारात आहे. शासनाकडून कृषी पर्यटन केंद्रांना अनुदान मिळाल्यास या व्यवसायाचा विकास होईल, असे मत कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष खेमनर- पाटील यांनी मांडले.

Monday, May 20, 2013 AT 04:00 AM (IST)

दुष्काळी सोयगाव तालुक्‍यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय जरंडी, जि. औरंगाबाद (सकाळ वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्‍यात भीषण दुष्काळ असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी साडेआठ हजार रुपये वाढीव कर्जपुरवठा करून पाचोरा डेपोमधून सोयगाव तालुक्‍याला खतपुरवठा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेतला आहे, अशी माहिती शुक्रवारी (ता.17) जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सोयगाव येथे दिली. सोयगाव पंचायत समितीच्या प्रांगणात (ता.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

90 गावांमध्ये होणार "एसआरआय' पद्धतीने भात शेती पुणे (सकाळ वृत्तसेवा) ः चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांतील भात पिकाचे उत्पादन पाच पट करण्याबरोबर रब्बीचाही हंगाम साधण्याचा चंग नागपूर कृषी विभागाने बांधला आहे. त्यासाठी एसआरआय (सिस्टिम ऑफ राइस इन्टेसिफिकेशन) पद्धतीच्या भात लागवडीचा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या खरिपामध्ये 90 गावांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

शेतकरी संघटनेची मागणी ः शेती कर्जाचे नूतनीकरण नको, ते माफच करावे सांगली (सकाळ वृत्तसेवा) ः शासन आदेश डावलून पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारीच्या गावातील शेतीपंपाची वीज तोडली जात आहे. त्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या तसेच चिनी वस्तूंची आयात याविरोधात संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. 17) निदर्शने केली.

Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)

हिंगोली : कळमनुरी येथे राज्यस्तरीय बळिराजा कृषी प्रदर्शनीचे 25 ते 27 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनीच्या मंडपाचे पूजन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार ऍड. राजीव सातव यांच्या पुढाकारातून तीन दिवस राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. 13) मंडपाचे पूजन करण्यात आले.

Saturday, May 18, 2013 AT 04:45 AM (IST)

छगन भुजबळ : नाशिकला जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक नाशिक - यंदाच्या खरीप हंगामात निविष्ठांचे लिंकिंग 100 टक्के थांबविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. रासायनिक खतांसोबत कोणताही वितरक यंदा इतर उत्पादनाची सक्ती करणार नाही. असे निदर्शनास आल्यास तातडीने कृषी अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. गुरुवारी (ता.

Saturday, May 18, 2013 AT 04:30 AM (IST)

पुणे  - विभागात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पात्र ठरलेल्या, एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांचा पुढील पाच वर्षांच्या विकासासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रोप्लॅनिंग) बनविण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील 218 गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विभागीय उपायुक्त इंद्रजित देशमुख यांनी दिली. श्री.

Friday, May 17, 2013 AT 05:15 AM (IST)

सोलापूर  - शहरातील काही भागात अवकाळी पावसाने बुधवारी (ता. 15) जोरदार हजेरी लावली. शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी साडेतीन वाजता रिमझिम पावसाला सुरवात झाली. तो सुमारे अर्धा तास पडत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. तो अर्धा तास पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते. गेल्या दहा दिवसांपासून 41 ते 43 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी मात्र 40.

Friday, May 17, 2013 AT 05:00 AM (IST)

वर्धापनदिनानिमित्त कृषी प्रदर्शन, विविध संशोधन संस्थांचा सहभाग परभणी  - मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 41 व्या वर्धापनदिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे शनिवारी (ता. 18) खरीप शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन, चर्चासत्र, प्रात्यक्षिक पाहणी तसेच विद्यापीठाचे बियाणे विक्री इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले आहे. देशपातळीवरील विविध संशोधन संस्थांच्या दालनांचा प्रदर्शनात समावेश असणार आहे.

Friday, May 17, 2013 AT 04:15 AM (IST)

- झळा दुष्काळाच्या लोगो - प्रातिनिधिक फोटो वापरावा (छावणी इ.) 1066 टॅंकर सुरू भूजल पातळी घटली नगर जिल्ह्यात सर्वाधिक बिकट स्थिती नाशिक  - नाशिक विभागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, विभागातील पिण्याच्या टॅंकरची संख्या एक 66 हजार झाली आहे. नंदुरबार जिल्हा वगळता नाशिक विभागातील चार जिल्ह्यांतील 893 गावे व 678 वाड्यांना 1066 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Wednesday, May 15, 2013 AT 04:00 AM (IST)

सर्वेक्षण धिम्या गतीने पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सर्वेक्षण अपूर्ण पुणे  - राज्यात सध्या सुरू असलेल्या फलोत्पादन गणनेलाही दुष्काळाचा फटका बसल्याचा दावा कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. गणनेचे सर्वेक्षण मार्च 2013 अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सर्वेक्षण अद्यापही पूर्ण झालेले नाही.

Tuesday, May 14, 2013 AT 04:45 AM (IST)

लक्ष्मणराव ढोबळे सोलापुरात खरीप आढावा बैठक सोलापूर  - ""शेतकऱ्यांनी "ठिबक'चा वापर करावा यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी,'' असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शनिवारी (ता. 11) रात्री झाली, त्या वेळी श्री. ढोबळे बोलत होते. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती जालिंदर लांडे, जिल्हाधिकारी डॉ.

Tuesday, May 14, 2013 AT 04:15 AM (IST)

पुणे  - जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ पशुवैद्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोग संशोधन प्रयोगशाळेचे संचालक डॉ. एम. राजशेखर, पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. ना. वि. तांदळे, उपाध्यक्ष डॉ. आर. टी. वझरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पशुवैद्य क्षेत्रात देशाच्या विविध भागांत काम करणाऱ्या सेवानिवृत्त पशुवैद्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. पी. एन.

Tuesday, May 14, 2013 AT 04:00 AM (IST)

पुणे, कोल्हापूर विभागांतील खरीप नियोजन बैठकीतील सूर पुणे  - येत्या खरीप हंगामात थेट बांधावर खते, बियाणे वाटप, मृद्‌संधारण, धान्याची साठवणूक व शेतीमालाची थेट विक्री अशा विविध घटकांवर भर देण्यात येणार असल्याचा सूर कृषी विभागाच्या खरीप हंगाम नियोजन बैठकीत निघाला. कृषी विभागाने पुणे, कोल्हापूर विभागांतील आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने असणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी नुकतीच (ता.

Monday, May 13, 2013 AT 03:45 AM (IST)

कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांची सूचना नाशिक व कोकण विभागातील खरीप आढावा कार्यशाळेचा समारोप नाशिक (प्रतिनिधी) : यंदाच्या खरीप हंगामात कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला खतांची "कमाल विक्री किंमत' (एमआरपी)पेक्षा अधिक दराने विक्री होणार नाही, याची प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्या. मूळ छापील किमतीपेक्षा एक रुपयाही शेतकऱ्याकडून जास्त आकारला जाणार नाही, याची दक्षता पणन मंडळानेही घ्यावी. खत वितरणातील गुंतागुंत काढून टाका.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

प्रकाश सोळंके ः परभणी येथे खरीप हंगाम नियोजन बैठक परभणी (प्रतिनिधी) ः बियाणे आणि खतांचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याचे शासनाचे धोरण असल्याने जिल्ह्यातील शेतकरी गटांची संख्या वाढणे गरजेचे आहे. कृषी विभागाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिली. येथील बी. रघुनाथ सभागृहामध्ये शुक्रवारी (ता. 10) आयोजित जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीमध्ये श्री. सोळंके बोलत होते.

Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)

नेदरलॅंड येथील पशुतज्ज्ञ कॅटरिन व्हॅन्ट हुप्ट यांचे मत पुणे  - हवामान बदल, प्रदूषणामुळे मानवी आरोग्याच्या बरोबरीने जनावरांतील आरोग्याच्या समस्यादेखील वाढत आहेत. त्यामुळे जनावरांच्या उपचारांचा खर्च वाढतो आहे. हे लक्षात घेता सुधारित व्यवस्थापन तंत्राबरोबरीने रोगांच्या उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर महत्त्वाचा आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ औषधी वनस्पतींच्या वापराबाबत जागरूक झाले आहेत.

Saturday, May 11, 2013 AT 04:30 AM (IST)

396 चारा छावण्या सुरू पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक 104 टॅंकर नगर  - जिल्ह्यात 455 गावे व एक हजार 933 वाड्यांना 638 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहेत. जिल्ह्यात छावण्यांची संख्याही 396 पर्यंत गेली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच टॅंकर व छावण्यांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात फक्त श्रीरामपूर तालुक्‍यात एकही टॅंकर सुरू नाही. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत उन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने टॅंकरच्या संख्येतही वाढ होत आहे.

Saturday, May 11, 2013 AT 04:15 AM (IST)

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश पाणी वळविल्याची प्रत न्यायालयात सादर औरंगाबाद  - जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी पिण्यासाठी श्रीरामपूर व इतर गावांसाठी वळविल्याची माहिती गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली. सुनावणीदरम्यान नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाणी वळविण्याच्या आदेशाची प्रतही न्यायालयात सादर करण्यात आली. विशेष म्हणजे, जायकवाडीसाठी वरील धरणातून फक्त 1.

Wednesday, May 08, 2013 AT 05:00 AM (IST)

दुष्काळातही मोठ्या प्रमाणात ऊस गाळप, दहा कारखान्यांची गाळप सांगता सातारा  - दुष्काळी परिस्थितीही सातारा जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळप केले आहे. एक मे अखेर 54 लाख 71 हजार 76 मे. टन उसाचे गाळप झाले होते. त्यापासून 65 लाख 80 हजार 666 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांपैकी दहा कारखान्यांची गाळपाची सांगता झाली असून, एकमेव सह्याद्री कारखान्याचे गाळप सुरू आहे.

Wednesday, May 08, 2013 AT 04:30 AM (IST)

नगर  - यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विविध खरीप पिकांच्या पेरण्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र तीन लाख 48 हजार 200 हेक्‍टर आहे परंतु यंदा खरीप पिकांच्या पेरणीसाठी सरासरी चार लाख 71 हजार 600 हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्याअंतर्गत एक लाख दहा हजार हेक्‍टरवर कापसाची, तर एक लाख 80 हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

Tuesday, May 07, 2013 AT 04:45 AM (IST)

सातारा  - उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची अधिकाधिक बचत करण्यासाठी यापुढील काळात पिकांना ठिबकद्वारेच पाणी देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (कृष्णाखोरे) मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी येथे बोलताना केले. सातारा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाचे उद्‌घाटन नुकतेच पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.

Tuesday, May 07, 2013 AT 04:15 AM (IST)

पुणे  - पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. यंदा 92 लाख 81 हजार 850 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. सरासरी 11.18 टक्के उताऱ्यातून एक कोटी तीन लाख 73 हजार 105 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा जिल्ह्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक 10 लाख 90 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Tuesday, May 07, 2013 AT 04:15 AM (IST)

गत वर्षभरात उपाययोजनांवर झाले 56 कोटी खर्च पुणे  - जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाची कामे, पिण्याचे पाणी आणि चारा छावण्या यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांवर सुमारे 56 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

Monday, May 06, 2013 AT 04:45 AM (IST)

3098 कामे सुरू मजुरांची सर्वाधिक संख्या जालना जिल्ह्यात औरंगाबाद  -   मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत "मनरेगा'अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी) सुरू असलेल्या 3098 कामांवर 60 हजार 242 मजूर कार्यरत असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सूत्रांनी दिली. मराठवाड्यात दुष्काळी स्थितीची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांवर एक लाख 360 एवढी मजूरक्षमता आहे.

Monday, May 06, 2013 AT 04:15 AM (IST)

पुणे ः पाणी व चाराटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे, पशुधन सांभाळणेही जिकिरीचे झाले आहे. इंधन, पशुखाद्य, मजुरीचे दर वाढलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दूध खरेदी व विक्री दरात वाढ करावी, की नको याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ कृती समितीची सभा आज (रविवार) पुण्यात होत आहे. कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.

Sunday, May 05, 2013 AT 12:00 AM (IST)

कृषी विभागाचा अंदाज : सहा लाख 65 हजार हेक्‍टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन नाशिक : जिल्ह्याचे खरीप हंगामातील विविध पिकांचे पेरणी क्षेत्र सुमारे सहा लाख 42 हजार हेक्‍टर आहे. यंदाच्या खरीप हंगामात सहा लाख 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक भागातील शेतकऱ्यांचा कल मका, कापूस व सोयाबीन या नगदी पिकांकडे वाढला आहे. या पिकांच्या क्षेत्रात यंदा प्रत्येकी 20 हजार एकराने वाढ होण्याचा अंदाज आहे.

Sunday, May 05, 2013 AT 12:00 AM (IST)

जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांची माहिती सातारा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात सुरू असलेल्या 127 चारा छावण्यांमध्ये एक लाख 11 हजार 160 जनावरांची सोय करण्यात आली असून, माण तालुक्‍यात सर्वाधिक 63 छावण्यांमध्ये 54 हजारांवर जनावरे असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. जिल्ह्यात यंदा सलग दुसऱ्या वर्षी पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

Sunday, May 05, 2013 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांनी सुधारित अन्नसुरक्षा विधेयक गुरुवारी (ता. 2) लोकसभेत सादर केले. याविषयी सभागृहात चर्चा होऊन लवकरच हे विधेयक मंजूर होईल असा आशावाद श्री. थॉमस यांनी या वेळी व्यक्त केला. यापूर्वी 22 डिसेंबर 2011 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक लोकसभेत सादर झाले होते. त्यावर चर्चा होऊन ते ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरणविषयक समितीकडे देण्यात आले.

Saturday, May 04, 2013 AT 02:00 AM (IST)

हैदराबाद- शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादन, चांगली साठवणक्षमता, चाऱ्याची उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या ज्वारीच्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे. या वाणांमध्ये समतोल अन्नद्रव्ये आणि पौष्टिकतेबरोबर लोह, कॅल्शिअम अशा प्रकारच्या घटकांचे प्रमाण वाढविले पाहिजे.

Saturday, May 04, 2013 AT 02:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: