|
राजकीय
नेत्यांचेच खासगी कारखाने असल्याने सहकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कोल्हापूर  - खासगी साखर कारखान्यांना आयकर लागू नाही, राज्यातील निम्म्याहून अधिक खासगी कारखाने हे मंत्री, आमदार, माजी मंत्री, माजी खासदार व देश पातळीवरील मोठ्या नेत्यांच्या मालकीचे आहेत. त्यामुळेच सहकारी साखर कारखान्यांवर लावण्यात आलेला आयकर रद्द करण्यासाठी सरकारच्या पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नसल्याची चर्चा कारखानदारांत आहे.
Wednesday, May 22, 2013 AT 04:45 AM (IST)
पंढरपूर, जि. सोलापूर - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसतील तर तेथून आपण लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे दिली. सोमवारी (ता. 20) पंढरपूर तालुक्यातील अजनसोह येथे दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची आठवले यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट घेऊन विचारपूस केली.
Wednesday, May 22, 2013 AT 04:30 AM (IST)
प्रकाश आंबेडकर  - आगामी निवडणुकांसाठी "महाराष्ट्र लोकशाही आघाडी' स्थापन मुंबई  - आगामी निवडणुकांमध्ये जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 23 पक्षांनी एकत्र येऊन "महाराष्ट्र लोकशाही आघाडी' स्थापन केल्याची घोषणा सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत करण्यात आली. जनतेच्या प्रश्नांवर ही आघाडी रस्त्यावरची लढाई लढेल तसेच निवडणुकाही लढवेल, असे श्री. आंबेडकर यांनी सांगितले.
Wednesday, May 22, 2013 AT 04:30 AM (IST)
जालना - जालना जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अस्तित्व कमी होण्यामागे केवळ जालना जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदार नसून हायकमांडने वेळोवेळी घेतलेले काही निर्णय त्यास कारणीभूत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात कॉंग्रेस रसातळाला गेल्याची खंत जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्यास आपणही कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.
Wednesday, May 22, 2013 AT 03:30 AM (IST)
बीड  - जी जनावरे छावणीत आहेत, त्यांना शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो मात्र छावणीत नाहीत, अशी असंख्य जनावरे दावणीला आहेत, त्यांना रोज साठ लिटरप्रमाणे टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, माजी खासदार रामदास आठवले यांनी केली. मराठवाडा पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विराट जाहीर सभा रविवारी (ता. 19) सायंकाळी घेण्यात आली, या वेळी ते बोलत होते.
Tuesday, May 21, 2013 AT 05:15 AM (IST)
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचा ठराव पाटाने पाणी देणाऱ्यांना कर्ज न देण्याची जिल्हा बॅंकेला विनंती सोलापूर  - जिल्ह्यात सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाणी बचतीसाठी उसासाठी ठिबक केलेल्या शेतकऱ्यांनाच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने पीक कर्ज द्यावे, असा ठराव सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत झाला.
Tuesday, May 21, 2013 AT 04:45 AM (IST)
मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांची माहिती पंढरपूर, जि. सोलापूर - सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आली आहे. राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळी जिल्ह्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहायता निधीमधून 120 कोटी रुपये दिले जाणार आहेत. टंचाई निवारण्याच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्याला 12 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी येथे दिली.
Tuesday, May 21, 2013 AT 04:45 AM (IST)
भिवंडी, जि. ठाणे  - राज्यात नागरीकरण वाढल्याने शेतजमिनी कमी होत आहेत, परिणामी शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. शेती करणेही हल्ली परवडत नाही मात्र याबाबत तोडगा न काढल्यास भविष्यात अन्नधान्याची समस्या वाढेल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. भिवंडीतील कापआळी येथे बांधण्यात आलेल्या भिवंडी- निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी (ता. 19) श्री. पवार यांच्या हस्ते झाले.
Tuesday, May 21, 2013 AT 04:30 AM (IST)
हिंगोली  - आपण शिवसेना तर सोडणारच नाही पण लोकसभा निवडणूक देखील लढवणारच, असे स्पष्टीकरण सेनेचे हिंगोलीचे खासदार सुभाष वानखेडे यांनी केले. येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना श्री. वानखेडे म्हणाले, ""गेल्या काही दिवसांपासून आपला इतर पक्षात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तसेच मी स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नसल्याची चर्चा आहे. कधी हदगाव विधानसभा, तर कधी नांदेड शहरातून विधानसभा लढवणार असे छापले जात आहे.
Tuesday, May 21, 2013 AT 04:30 AM (IST)
मालवण, जि. सिंधुदुर्ग  - गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीच्या अहवालांमुळे जिल्ह्यातील विकासाला खीळ बसणार असल्याने हे दोन्ही अहवाल स्वीकारू नयेत, असा ठराव शनिवारी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्वानुमते घेण्यात आला. ही सभा सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Monday, May 20, 2013 AT 04:45 AM (IST)
यवतमाळ मतदारसंघातील चित्र रिंगणात दहा उमेदवार नीलेश फाळके यवतमाळ : यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वाढत्या उन्हाळा असूनही आता प्रचाराला जोर येऊ लागला आहे. आता पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असला, तरी या माध्यमातून आमदार होण्याची स्वप्न पाहणारे अनेकजण पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
Monday, May 20, 2013 AT 04:30 AM (IST)
सातारा - दहा वर्षांत सिंचनावर 70 हजार कोटी रुपये खर्च झाले असून, यातील दहा टक्के रक्कम जरी जलसंधारणावर खर्च केली असती तरी हा दुष्काळ पाहावा लागला नसता. सध्याचा दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून तो मानवनिर्मित आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 18) येथे केली. ते म्हणाले, ""सध्याचे राज्यशासन भ्रष्ट, अकार्यक्षम आहे. 55 दिवस उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत उपमुख्यमंत्री असभ्य बोलतात.
Monday, May 20, 2013 AT 04:15 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  - सोलापूर जिल्ह्यास सिमेंट बंधाऱ्यांसाठी 30 ते 40 कोटी सोलापूर - सध्या जलस्रोतांमधील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाळ्यातही हे काम चालू ठेवून लोकसहभागातून जास्तीत जास्त गाळ काढून जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शुक्रवार (ता. 18)पासून सोलापूर जिल्ह्यात होते.
Monday, May 20, 2013 AT 04:15 AM (IST)
सादरीकरण पाहण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही मुंबई ः राज्यातील जनतेची दरडोई उत्पादकता, अर्भक मृत्यू प्रमाण आणि शिक्षण या प्रमुख तीन घटकांसह राज्यातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा अधोरेखित करणारा राज्याचा "मानव विकास अहवाल-2012' तयार झाला आहे. मात्र या अहवालाचे सादरीकरण पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याने या अहवालाचा अंतिम मसुदा धूळखात पडला आहे.
Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)
पिचड, ठाकरे यांच्या आग्रहानंतरही बैठक घेण्याकडे काणाडोळा केल्याचे आश्चर्य मुंबई ः राज्यात अनेक समस्या असताना धोरणात्मक निर्णयासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा "खो' घातल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने समन्वय समितीच्या बैठकीची जाहीर मागणी करूनही मुख्यमंत्र्यांनी याकडे काणाडोळा केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)
मुंबई (सकाळ न्यूज नेटवर्क) ः सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी "महायुती'चे घटक पक्ष असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांची मुंबईत शुक्रवारी (ता. 17) एकाच दिवशी "सदिच्छा' भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या नेत्यांनी उदयनराजे भोसले यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)
मुंबई  - राज्यात 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळात पिण्याचे पाणी, धान्य व चाऱ्याचा तुटवडा जाणवत होता. सुदैवाने यंदा धान्याची परिस्थिती बरी असून वैरण व पाण्याचा तुटवडा मात्र जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. राज्यात दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी शासन करीत असलेल्या उपाय योजनांबद्दल प्रा. ढोबळे यांनी माहिती दिली.
Saturday, May 18, 2013 AT 05:00 AM (IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या मागणीस राज्य सरकारची मंजुरी शिर्डी, जि. नगर  - राज्यातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागात पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केलेल्या मागणीवरून मंजूर झालेल्या पॅकेज मधून हा निधी मंजूर झाला आहे.
Saturday, May 18, 2013 AT 04:45 AM (IST)
कसबा बीड, जि. कोल्हापूर  - ग्रामपंचायत प्रभागाप्रमाणे कुंभी-कासारी साखर कारखान्याची निवडणूक गटवार घ्यावी व तशी दुरुस्ती कारखान्याच्या घटनेत करावी, अशी मागणी सावरवाडी (ता. करवीर) येथील कम्युनिस्ट पक्षाच्या सभागृहात विरोधी पक्षातील नेत्यांची बैठकीत झाली. माजी सभापती पी. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. पाटील म्हणाले, ""आमच्या सत्ताकाळात प्रतिकूल परिस्थितीत चांगला दर दिला.
Saturday, May 18, 2013 AT 04:30 AM (IST)
यवतमाळ पोटनिवडणूक योगेश पारवेकर यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी यवतमाळ  - यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांनी बुधवारी (ता. 15) कॉंग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
Friday, May 17, 2013 AT 05:15 AM (IST)
मुंडीपार येथील कार्यक्रमात कृषिमंत्री शरद पवार यांचे आवाहन भंडारा  - वैनगंगा नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी फळबागा लावाव्यात असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार येथे आवाहन केले. तर राज्यात मोठे उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना अधिक सवलती देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Friday, May 17, 2013 AT 04:30 AM (IST)
झेडपी, पंचायत समिती पदाधिकाऱ्यास चहापानासाठी 150 रुपये भत्ता देण्याचा शासनाचा निर्णय सोलापूर  - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांना बैठकी-सभांमध्ये आता चहाच नव्हे, तर साधे जेवण घेणेही शक्य होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने सभांच्या चहापानाचा खर्च 50 रुपयांवरून दीडशे रुपये केला आहे. राज्यात दुष्काळाने जनता सैरभैर झाली आहे. पाण्यासाठी सगळीकडे जिवाचा आकांत सुरू आहे.
Friday, May 17, 2013 AT 04:00 AM (IST)
शेवगाव, जि. नगर  - भयाण दुष्काळात मुक्या जनावरांना जगविण्यासाठी कोट्यवधीचे पशुखाद्य मोफत देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. अन्य कोणत्याही पक्षातील नेते अशा कामासाठी पुढे सरसावले नाहीत. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याचा आवर्जून उल्लेख करून अशा घटनेची खूणगाठ अंतर्मनात बांधून ठेवणार की नाही, असा सवाल आमदार चंद्रशेखर घुले यांनी येथे केला.
Thursday, May 16, 2013 AT 04:30 AM (IST)
मुख्यमंत्र्यांची घोषणा  - प्रकल्पाला भेट, प्रकल्पग्रस्तांची सभा पवनी - इंदिरा सागर गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे, असा शासनाचा निर्णय होणे गरजेचे होते. प्रकल्पग्रस्तांना 1200 कोटींचे विशेष पॅकेज निश्चित झाले आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या कार्यात मदत होईल व धरणाचे थांबलेले काम पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. गोसेखुर्द धरणाजवळील राजीव टेकडीवर मंगळवारी (ता.
Thursday, May 16, 2013 AT 03:45 AM (IST)
इस्लामपूर  - ऊसदर आंदोलनातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर नुकसानभरपाईपोटी बजावलेल्या नोटिसा या राजकीय षडयंत्राचा भाग आहेत. भरपाईचा एक रुपयाही शेतकरी देणार नाहीत. न्यायालयीन पातळीवर लढा देण्याची वेळ आलीच तर संघटनेच्या कार्यकर्त्यांना एक रुपयाचीही तोशीष लागू देणार नाही. सर्व खर्च संघटना करेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Wednesday, May 15, 2013 AT 04:30 AM (IST)
इचलकरंजी  - सुतापासून कापडनिर्मितीपर्यंत आणि प्रोसेसपासून गारमेंटपर्यंत वस्त्रोद्योगातील सर्व व्यवसायांची पाहणी नुकतीच केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव श्रीमती झोहरा चटर्जी यांनी केली. यंत्रमाग व्यवसायातील छोट्या उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगास अर्थसाहाय्यासाठी केंद्र शासन लवकरच कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Wednesday, May 15, 2013 AT 04:30 AM (IST)
उस्मानाबाद  - उस्मानाबाद-उजनी पाणीपुरवठा योजनेत काही दोष आहेत का, कामात काही त्रुटी राहिल्या आहेत का, याची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. या संबंधीचे आश्वासन मी सभागृहात दिले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली. शहरातील औषधी भवनमध्ये सोमवारी (ता. 13) आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे यांनी ही माहिती दिली.
Wednesday, May 15, 2013 AT 04:30 AM (IST)
कोल्हापूर  - जिल्हा बॅंकेच्या थकीत कर्जापोटी दौलत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या बॅंकेच्या कारवाईविरोधात "दौलत'ने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली. या कारवाईबाबत कारखाना बॅंकेसोबत असल्याचे प्रतिज्ञापत्रही "दौलत'च्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. "दौलत'ने या प्रकरणातून अचानक घूमजाव केल्याने या याचिकेतील दुसरे वादी असलेल्या नाशिकच्या थिटे पेपर्स कंपनीची चांगलीच पंचाईत झाली आहे.
Wednesday, May 15, 2013 AT 03:30 AM (IST)
अजित पवार चिचोंडी पाटील, भातोडीत मजुरांशी साधला संवाद चिचोंडी पाटील, जि. नगर  - तलावातील गाळ भरून देण्याची व्यवस्था करू पण वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावा. लोकसहभागातूनच तलावातील गाळ काढणे शक्य आहे. छावण्यांतील जनावरांवर लावली जाणारी तगाई (महसुली वसुली) माफ करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चिचोंडी पाटील येथे रविवारी (ता.
Tuesday, May 14, 2013 AT 04:15 AM (IST)
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन मुंबई  - कै. यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे जीवन फुलवले. त्याचे प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या विपुल साहित्य लेखनात दिसून येते. जीवनात कोणाला नैराश्य आले, तर त्याने यशवंतरावांचे साहित्य अवश्य वाचावे नैराश्य दूर होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. "आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार' या के. जी.
Monday, May 13, 2013 AT 04:45 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत तालुक्यात चारा छावणीची पाहणी कर्जत, जि. नगर  - ""सध्या दुष्काळ तीव्र आहे. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी आपणही सहकार्य करा.'' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चिंचोली काळदात (ता. कर्जत) येथील रघू आबा काळदाते यांच्या छावणीला रविवारी (ता.
Monday, May 13, 2013 AT 04:30 AM (IST)
|